
प्रतिनिधी- सोलापूर
पंढरपूर आषाढी वारी २०२६, सुरक्षित आणि अत्यंत सुनियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार कृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन (IAS)यांचा तीर्थक्षेत्र पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल आणि मानाची टोपी देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकारातून अंबादास गज्जम, अशोक ढोणे, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, डॉ. राम हुंडारे आदींच्या हस्ते जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वारीदरम्यान आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी,सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांचे सुव्यवस्थित व योग्य नियोजन करण्यात आल्याने लाखो वारकऱ्यांना कोणतीही मोठी अडचण न येता विठ्ठल दर्शनाचा लाभ घेता आला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी . एस. कार्तिकेयन (IAS) यांनी पत्रकार कृती समितीचे आभार मानले. आषाढी वारीचे यशस्वी नियोजन हे केवळ जिल्हा प्रशासनाचे नसून पोलीस यंत्रणा, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच पत्रकार बांधवांच्या सहकार्याचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.“जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कार्यरत राहीन. आपल्या विधायक लेखणीच्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करावे,” अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन (IAS) यांनी व्यक्त केली.
या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मिलिंद(नाना)प्रक्षाळे, सारा न्यूज नेटवर्क चे संपादक डॉ.राम हुंडारे, साप्ताहिक फुलेवादचे अशोक ढोणे, महाराष्ट्र पोलीस वार्ताचे अमोल कुलकर्णी, साप्ताहिक सोलापूर संघर्षचे गिरमल्ला गुरव, अस्लम नदाफ, नितीन करजोळे, सिद्धार्थ भडकुंबे आदींसह इतर पत्रकार बांधव पत्रकार कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज सोलापूर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579848240
















