
प्रतिनिधी – अक्कलकोट :
दि. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, जुलूस, मिरवणूक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


जुलूस व मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते सुरक्षित करावेत, तसेच ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत ठेवावा, अशी मागणी महावितरण व नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
धार्मिक कार्यक्रमांदरम्यान नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने रस्त्यांची सुरक्षितता आणि सुरळीत वीजपुरवठा यांना प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी शुकूर शेख, दाता बळोरगी, सोहेल फरास, इरफान दावना, रशीद खिस्तके, सैपन शेख, सैपन हगलदिवटे, मुबारक कोरबु, रजाक शेख, अकिब बागवान, बाबा पठाण, कायुम बेपरी, इम्रान हगलदिवटे, समीर शेख, अकिल मुजावर, पालडे आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.















